महापुरुषांच्या विचाराची काव्यात्मक अक्षर पेरणी बहरली
पुणे: प्रतिनिधी महापुरुषांच्या
विचाराचा वारसा व विचार समाजामध्ये रुजावीत व ते विचार अंगीकृत करावे यासाठी साहित्यिक कविता द्वारे विचारातून समाज परीवर्तन करत आहेत. असे मत ॲड.शरद दरेकर यांनी प्रस्ताविकेत मांडले.
साहित्य सम्राटचे २०४ वे कवीसंमेलन व वारसा विचारांचा ग्रुप शिक्रापूर यांचे संयुक्त विद्यमानाने सोनल कॅफे 1906 पाबळ रोड शिक्रापूर येथे आयोजित केले होते. कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली. वारसा महापुरुषांच्या विचारांचा या विषयासह वास्तववादी आणि मनाला भावणाऱ्या कविता व गझल मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे
आदरणीय विनोद अष्टुळ यांची प्रबोधनात्मक भाष्य करणारी स्वराज्य ही सुप्रसिद्ध गेय कविता, युवा कवी सागर जाधव यांचे प्रेमगीत, रफिक इनामदार यांची तुपातली पोळी, सूर्यकांत नामूगडे यांची वय झालं म्हणून काय झालं, तसेच बबन धुमाळ यांची गझल, अशा अनेक दर्जेदार काव्य आणि गझलांना उपस्थित काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.
विचारपीठावर मान्यवर कवी किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, बबन धुमाळ, मंगलाताई सासवडे आणि वारसा विचारांचा ग्रुपच्या अध्यक्षा अलका जोगदंड, आणि साहित्यसम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ उपस्थित होते.
यावेळी नानाभाऊ माळी, रूपाली भोरकडे, दशरथ दुनधव, सागर जाधव, बाहुबली मिसाळ, रफिक इनामदार, गजानन गायकवाड, उषा संतोष मासळकर , रोहिणी दरेकर, नंदिनी भोरकडे, महेंद्र पगार, गोरक्ष ताठे, निळू चौरे, निलेश गुंड, शहाजी घोडे, ॲड. शरद दरेकर, विशाल काळोखे, शिवाजी घोडे, कोमल घोडे, पूजा घोडे, मंदाताई भुजबळ, इत्यादी कवी, कवयित्री आणि काव्य रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले.