
हुंडा.. घेणाराही पापी आणि देणारा त्याहून महापापी, :- सौ उषामाई कांबळे.(उपनेत्या शिवशाही)
पिंपरी:- 27/05/25 , प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) आई वडिलांना वाटत असत की आपली लेक सासरी आनंदाने नांदावी म्हणून तिला अवाजवी आहेर सोबत पाठवतात आणि मुलाकडचे भिकार्यांसारखे असतातच वाट पाहून काय काय सूनबाई येते घेऊन मग त्यावरून त्या सुनेला घरात किती मान द्यायचा ते ठरते आणि किती छळ करायचा तेही कारण एकदा सासरच्यांना सूनबाई कडून येणारा आहेर दिसला की हळू हळू मागण्या वाढवायच्या आणि मग त्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मग सूनबाईला छळायचं..
मग ती त्रासाला कंटाळून माहेरी सांगेल परत माहेरचे मुलगी सुखाने रहावी म्हणून मागण्या पूर्ण करतात आणि नाहीच मागण्या पूर्ण झाल्या तर सूनबाईला कशाला जिवंत ठेवायचं..?
यात काय होत माहितीये का यात त्या निष्पाप मुलीचा जीव जातो कोणाच काहीही जात नाही..
माहेरचे रडतात वाईट वाटत पण चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिलं त्यामुळे मुलगी मेली..
सासरच्यांना काही नाही होऊन होऊन काय होईल केस होईल..
आपण आजही प्रथेच्या आड कित्येक मुलींचा बळी देतो नै..?
काही सासरचे चांगले असतात सुनेकडून एक रुपयाची अपेक्षा ठेवत नाहीत काही सूना चालाक असतात त्यांना वाटत सासरी सगळी सोय जरी असली तरी आपण आपली सोय नवर्यासोबत दुसरीकडे करू यासाठी मुद्दाम अवाजवी हुंडा स्वतः घेऊन येतात..
काही मुली सासरचे श्रीमंत भिकारी असल्याचे समजल्यावर माहेरहून एक रुपया सुद्धा घेऊन येत नाही..
काही माहेरचे येवढी शिकवलेली मुलगी अशा श्रीमंत भिकार्यांना देतोय आनंदाने नांदवली तर ठीक नाहीतर आमची मुलगी आम्हाला जड नाही,आजही कित्येक घरात हुंड्यावरुन सुनेचा बळी घेतला जातो..
येवढंच की, गरिबांच्या मुलींचे हाल प्रकाशित होत नाहीत आणि श्रीमंतांच्या घरच्या सुनेचा त्रास लपून राहत नाही..
मुलींनो तुम्हाला लढता आलं पाहिजे.. माहित नाही परिस्थिती कधी कशी येईल माहेरचे आपल्याला सांभाळतील नाही सांभाळतील.. तुम्ही खमकं व्हायला पाहिजे..
एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल तर सोशल मीडिया खूप मदत करू शकतो..
उधळून लावा अशांची इभ्रत..
मी स्वतः पाहिल आहे काही घरात मुलींचे माहेरचे मरे पर्यन्त मुलीचं तोंड पाहत नाहीत.. काही सैराट घडवून आणतात.. काही आयुष्यभर सांभाळतात पण त्यातही टोमणे चालू असतात..
काही घरांतील मुली माहेरच्यांचा आधार होतात काही माहेरचे मुलींचा आधार होतात..
आयुष्य खूप खडतर आहे मुलींनो खमकं व्हा, खरच छळ झालेल्या सुनांचा आवाज शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली व्हा असं स्पष्ट मत शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या सौ.उषामाई कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
✒️