
गरीबांच्या रेशनकार्डवर गदा येत असणार्या जाचक अटी तात्काळ रद्द करा. – लोकसेवक युवराज दाखले
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे खाते असल्याने इमेल द्वारे मागणी
मुंबई -प्रतिनीधी ,महाराष्ट्र शासनाच्या अन्नधान्य वितरण पुरवठा परिमंडळ विभागाच्या वतीने अलीकडच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा रहिवासी पुरावा म्हणून गृहीत धरले जात असणारे रेशनिंग कार्ड नूतनीकरण करण्यासाठी (के.वाय.सी) साठी रहिवासी पुरावा, उत्पन्नाची आट व इतर काही जाचक अटी आपल्या प्रशासनाकडून टाकण्यात आलेल्या आहे या जाचक अटींमुळे गोरगरिबांचा रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद होणार असल्याने त्यांची फार मोठी कुटुंबांना होणार आहे असं दाखले यांनी इमेल द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तरी आपण तात्काळ आपल्या प्रशासनाला सूचित करून रेशन कार्ड साठी तयार करण्यात आलेल्या जाचकाठी तात्काळ रद्द कराव्यात अन्यथा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने उभारण्यात येतील या कामे उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपले व आपल्या प्रशासनाचे राहील असा इशारा लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.