साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वांड:मय पुरस्कार”*(वर्ष ८ वे)

https://forms.gle/f1uguJrKQhh42pTv6
*मातंग साहित्य परिषद, पुणे (माझा इंडिया न्यूज ) 13/12/2024
*”साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वांड:मय पुरस्कार”*(वर्ष ८ वे)
*या पुरस्कारासंदर्भातील नामांकन अर्ज स्वीकृती*
*जाहीर प्रकटीकरण*
मराठी,हिंदी ,इंग्रजी ललित, वैचारिक,समीक्षानात्मक,संशोधनात्मक,अध्यात्मिक साहित्याच्या क्षेत्रांत आपल्या साहित्यकृती किंवा कलाकृतीच्या माध्यमातून मोलाची भर घालणा-या साहित्यिकांच्या ग्रंथाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा सन्मान करण्यासाठी शाल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून त्यांच्या कलाकृतींना *” साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वांड:मय पुरस्काराने”* गौरवण्यात येणार आहे.
*मातंग समाजातील व मातंगत्तेर समाजातील साहित्यिकांच्या साहित्यकृतीला दिला जाणाऱ्या पुरस्कारासंदर्भातील निकष*
ह्या पुरस्कारासाठी वर्षालगतच्या मागील वर्षातील पुस्तकांचा विचार केला जातो. या वर्षी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४या वर्षांतील प्रकाशित पुस्तके विचारात घेतली जाणार आहेत.
यावर्षी वैचारिक,समीक्षानात्मक,संशोधनात्मक,अध्यात्मिक इत्यादी विभागात हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठींच्या ग्रंथांच्या नावांचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात.ललित साहित्याच्या संदर्भात… १)ज्यांच्या साहित्यकृतीतून मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त झाली आहे.
२.)ज्यांच्या साहित्यकृतीतून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन घडविले गेले आहे.
३)ज्यांच्या साहित्यकृतीतून सार्वकालीन व सार्वजनिक मूल्यांचा आविष्कार झालेला आहे. ४) ज्यांच्या साहित्यकृतीमुळे मातंग साहित्य प्रवाहाच्या संचितात मोलाची भर पडली आहे किंवा ज्यांची साहित्यकृती मातंग साहित्य प्रवाहाच्या इतिहासात महत्त्वाची ठरली आहे.
५) साहित्यकृती ही समाजाला जोडणारी असावी समाजाला तोडणारी नसावी याचाही विचार गांभीर्याने या ठिकाणी केला जातो.
,……………………………………………..
*वैचारिक साहित्याच्या संदर्भात…*
१.) इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य-संशोधन व समीक्षा यांसारख्या वैचारिक क्षेत्रांत ज्यांच्या लेखनामुळे मातंग समाजाच्या दृष्टिने महत्त्वाची भर पडली आहे.
२)त्या त्या क्षेत्रात ज्या साहित्यिकांनी नि:स्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध घेतला आहे.
३)ज्यांची जाणीव मानवी स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय व सामाजिक न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाली आहे.
४)मातंग समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ज्यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे.
५) मातंगत्तेर समाजातील साहित्यिकांच्या साहित्यकृती ह्या शक्यतो मातंगऋषी, आद्यक्रांतीगुरु लहुजीवस्ताद साळवे, ज्ञानज्योती मुक्ता साळवे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व मातंग समाजातील महान व्यक्तिंच्या वरील चरित्रांचा तसेच मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संस्कृतीवर भाष्य केलेले ग्रंथ त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या सर्वच घटकावर संशोधनात्मक समीक्षात्मक ग्रंथ इत्यादींना प्राधान्य देण्यात येईल तसेच इतर ग्रंथाचा त्याच्या गुणात्मक पातळीवर विचार केला जाईल.पुरस्कारासाठी संपादित ग्रंथांचा, अनुवादित ग्रंथांचाही विचार केला जाईल.
६.) विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींना हा पुरस्कार दिला जाणार असून, त्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, समिक्षा,
बालसाहित्य, ललित, वैचारिक,भाषांतर,प्रवासवर्णन,विनोदी साहित्य,आणि इतर सर्व साहित्य प्रकारातील साहित्य मागविण्यात येत आहे.
७) ग्रंथाच्या प्रति पाठवताना ग्रंथाच्या शेवटच्या पानावर जर मातंग समाजाचे लेखक असतील तर मातंग समाजाचा लेखक असा नमुद करावा. अथवा जर मातंग समाजाचे लेखक नसतील तर मातंगत्तेर लेखक असा उल्लेख करावा.ही विनंती. तसेच आपला संपर्क क्रमांक व पत्ताही शेवटच्या पानावर नमुद करावा (मलपृष्ठाचे मागे)
८.अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे याचा अंतिम निर्णय हा संयोजकाकडे असेल, पुरस्काराच्या निवडीबाबत व अपात्रेतेबाबत कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. याची नोंद उमेदवाराने घ्यावी.
*तरी ग्रंथांच्या किंवा पुस्तकाच्या दोन प्रती, लेखकाचा अल्प परिचय आणि पासपोर्ट साईज दोन फोटो ३० जानेवारी २०२४ पर्यंत पोहचतील अशा रितीने खालील पत्त्यावर पाठवावे.*
*डॉ.धनंजय भिसे*
*संस्थापक/अध्यक्ष: मातंग साहित्य परिषद,*
*’ निर्मलसावली ‘अयोध्या नगरी,कोकणे नगर,पाचपीर चौकाजवळ, काळेवाडी, पिंपरी, पुणे- पिन कोड-४११०१७*
*मोबा.नंबर 9822508492/7972984536*
मराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रांत आपल्या साहित्यकृती किंवा कलाकृतीच्या माध्यमातून मोलाची भर घालणा-या साहित्यिकांच्या ग्रंथाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा सन्मान करण्यासाठी शाल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
*” साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वांड:मय पुरस्काराने”* गौरवण्यात येते.
साहित्यकृती पाठवल्यानंतर आपल्याला पत्राद्वारे अथवा एसएमएस द्वारे पुरस्कार निवडीचा निरोप पाठवला जाईल.
*,………………………………………………*
*टीप- प्रवेशिका शुल्क हे १००रुपये (शंभर रुपये)असून ते ना परतावा असेल.*
*इतर कोणत्याही प्रकारचे शुल्क व छुपे खर्च आपल्याकडून आकारले जाणार नाही.*
*समक्ष पुरस्कार स्वीकार करण्यासाठी स्वतः लेखकाने किंवा त्याच्या प्रतिनिधीने हजर राहणे सक्तीचे आहे. जर लेखक किंवा त्यांचा प्रतिनिधी हजर राहिले नाही तर आपल्याला जो पुरस्कार घोषीत केला जाणार नाही. तो रद्द समजला जावा.*
*कोणीही पोस्टाने किंवा कुरीयरने पुरस्कार पाठवण्यासाठी आग्रह करू नये.*
* समारंभ स्थळी आपल्या भोजनाची किंवा अल्पोपहाराची व्यवस्था ही निशुल्क केली जाईल.
,……………………………………………..
( *कृपया हा संदेश मातंग समाजातील व मातंगत्तेर समाजातील साहित्यिकांपर्यंत पोहोचावा या हेतूने प्रयत्न करावे अथवा आपण सामाजिक जाणीवेतून आपण इतर पाच व्हाट्सअप ग्रुपवर,फेसबुक ग्रुपवर, इंस्टाग्राम, ट्विटरवर फॉरवर्ड करावा ही विनंती.*)
*गुगल लिंक वरुन आपला अर्ज भरावा*
*डॉ.धनंजय भिसे*
*संस्थापक:मातंग साहित्य परिषद,पुणे*
*मोबा.नंबर 9822508492/7972984536*